एकनाथ शिंदे बनणार विराेधी पक्षनेता… सामाजिक कार्यकर्त्याच्या पोस्टाने राज्यात भूकंप
मुंबई : येत्या 5 डिसेंबरला महायुतीचा शपथविधी आहे. त्या शपथविधीची जोरदार तयारी भाजपने सुरु केली आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या या शपथविधीच्या तयारी पाहणीस शिंदे गटाचा एक नेता सामील नव्हता. भाजप आिण राष्ट्रवादी अिजत पवारर गटाच्या नेत्यांनी ही पाहणी केली. त्यामुळे महायुती महत्त्वाचा घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट मात्र नाराज असल्याचा त्यावरून दिसून येते. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं मुख्य प्रकाशझोतापासून दूर राहिले असले तरीही मंत्रिमंडळात त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, याची बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
शिंदे गटाने मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले असले तरीही ते गृहमंत्रीपद आणि 13 मंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं बोललं गेलं. सुरुवातील मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदासाठीसुद्धा त्यांच्या नावाच्या चर्चांना वाव मिळाला. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका पोस्टनं सत्तास्थापनेता गुंता आणखी वाढवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. त्यांच्या या पोस्टानुसार राज्यात विरोधी पक्ष म्हणून शिंदे गट काम करणार असल्याचा सुतोवाच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याची एक प्रश्नार्थक पोस्ट त्यांनी केली आणि हा तिढा आणखी वाढल्याचं स्पष्ट झालं. सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी X पोस्टमध्ये लिहिलेल्या ओळी पाहता येत्या काही दिवसात महायुतीत नेमक्या कोणत्या राजकीय घाडमोडी घडणार आणि खरंच राज्यात राजकीय भूकंप येणार का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते?
परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते.
४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजप ला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले,
दाल मे कूछ काला है.
ते पत्रकार मला म्हणाले की भाजप…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 2, 2024
दमानियांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
‘एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते. 4 दिवसांपूर्वी PC घेऊन भाजप ला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है.’
माध्यम प्रतिनिधींचा हवाला देत ही भाजपचीच रणनीती असून, यामध्ये विरोधी पक्षच संपवण्याचा भजपचा कट असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. (भाजपला) त्यांना हवे नको ते सगळं पुरवलं जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण यांचाच… या शब्दात त्यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळं आता राज्याच्या राजकारणात पुढं नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.