बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जी जाणार जेलमध्ये
ममता बॅनर्जीं यांच्या सरकारने संदेशखळीतील महिलांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. भाजपचे सरकार आल्यास चौकशी आयोग स्थापन केला जाईल, ममता बॅनर्जी यांचीही तुरुंगात रवानगी होणार असल्याचा दावा बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. सुवेंदू अधिकारी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा हेतू वाईट आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संदेशखळी येथील महिलांना अटक करण्याचा कट ममता यांनी रचला होता. शाहजहान शेख यांच्यासारख्या नेत्याच्या अत्याचाराविरोधात महिलांना खोटे आरोप करून अटक करण्यात आली. सुवेंदू अधिकारी मंगळवारी एका रॅलीला संबोधित करण्यासाठी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सुंदरबनमध्ये पोहोचले होते. एक दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांनी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संदेशखळीच्या घटनेनंतर त्या प्रथमच या ठिकाणी पोहोचल्या.
संदेशखळी येथे निदर्शने करण्यासाठी मोठ्या रकमेचा गैरवापर करण्यात आल्याचे ममता म्हणाल्या होत्या. पण मी याबद्दल जास्त बोलणार नाही. खोट्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते.
मुस्लिम मतांमुळे टीएमसीने बसीरहाट जागा जिंकली
अधिकारी म्हणाले की, बसीरहाट लोकसभा जागा टीएमसीने जिंकली, त्यामुळे तिथे मुस्लिम व्होट बँक आहे. संदेशखळी विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचा विजय होईल. कारण हिंदू आधीच संघटित आहेत. त्यांनी टीएमसीची दडपशाही पाहिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
फेब्रुवारी 2024 मध्ये संदेशखळी भागातील काही स्थानिक TMC नेत्यांवर महिलांवर सामूहिक बलात्कार आणि जमीन बळकावल्याचा आरोप होता. पार्श्वभूमीवर सीएम ममता बॅनर्जी यांनी सोमवारी संदेशखळीला भेट दिली आणि गावाविषयी खोट्या बातम्या पसरवण्यासाठी मोठा पैसा खर्च केल्याचा आरोप केला.
या घटनेबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संदेशखळी दौऱ्यात सांगितले की, “मला माहित आहे की, यामागे मोठा खेळ होता, त्यात पैसा गुंतला होता, पण नंतर लोकांना कळले की हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. शेवटी सत्य बाहेर येते. पुढे गेले आहेत, मला या गोष्टी माझ्या मनात ठेवायची नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.