क्राइम

अहिल्यानगरमध्ये बर्निंग बसचा थरार, 40 प्रवाशी थोडक्यात बचावले

अहिल्यानगर-मिरज रस्त्यावर एका धावत्या बसने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. ही बस जवळपास ४० प्रवाशांना घेऊन नाशिकवरून सोलापूरच्या दिशेनं जात होती. दरम्यान, एसटीच्या बॅटरीमधून अचानक धूर निघायला सुरुवात झाली. यानंतर अवघ्या काही क्षणात बॅटरीचा भडका उडाला. या भडक्यात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाची बाब म्हणजे चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे.

अपघातग्रस्त झालेली बस आज सकाळी सहा वाजता नाशिकवरून सोलापूरच्या दिशेनं निघाली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव बसस्थानकापर्यंत येईपर्यंत ही बस सुस्थितीत होती. मात्र मिरजगाव बसस्थानकावरून ही बस निघाल्यानंतर अवघ्या ५०० मिटर अंतरावर बसच्या बॅटरीमधून धूर निघू लागला. यानंतर धूर नेमका कुठून निघतोय, हे पाहण्यासाठी चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवली.

त्यांनतर त्यांनी खाली उतरून बस तपासली असता, इंजिनच्या बाजुने बसने पेट घेतल्याचं चालकाच्या लक्षात आलं. यानंतर प्रसंगावधान दाखवत चालक आणि वाहकांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरवलं. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडीतून प्रवास करणारे 40 प्रवासी सुखरुप बचावले आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button